भूमिहीनांना सुद्धा मिळणार जमीन ; तब्बल 1 लाख 60 हजार एकर जमिनीचे होणार आहे वाटप, तुम्ही आहात का पात्र जाणून घ्या खालील लेखामध्ये..

जमिनीचे वाटप – भूदान आंदोलना ला ६० वर्षे झाली आहेत. यादरम्यान बिहारला १ लाख ६० हजार एकर जमीन दान करण्यात आलेली असून आता त्या भूमिहीनांना वाटप करण्यास योग्य निर्णय असल्याचे बिहार सरकारला आढळून आले.

माहे डिसेंबर 2022 नंतर सुरु होईल प्रक्रिया –

महसूल अधिकाऱ्यांकडून प्रमाणित अशा १ लाख ६० हजार एकर जमिनीच्या वितरणाची प्रक्रिया डिसेंबरनंतर कधीही सुरू होऊ शकते, अशी माहिती बिहारच्या महसूल व भूसुधार विभागातील सूत्रांकडून मिळाले आहे.

काही अडचणीमुळे ही प्रक्रिया थांबलेली होती –

भूदान समितीने जेव्हा तपासणी केली, तेव्हा अनेक जमिनींचे कागदोपत्री तपशील नसल्याचे त्यांना आढळले. शिवाय यातील अनेक जमिनीच्या खोट्या नोंदी म्हणजेच नदीपात्रात, जंगलात किंवा डोंगरात असल्याचेही भूदान समितीला आढळून आले. या भूदान समितीने जेव्हा तपासणी केली, अडचणींमुळे ही संपूर्ण प्रक्रिया प्रदीर्घ तेव्हा काळ रखडली.

आयोगाच्या अहवालीची वाटचाल –

नोव्हेंबरमध्ये अहवाल भूदान चळवळी अंतर्गत सुमारे ६.४८ लाख एकर जमीन संपादित झालेली होती. या जमिनीच्या व्यवस्थापन व वितरणातील अनियमिततेमुळे चौकशीसाठी राज्य सरकारने २०१७ मध्ये तीन सदस्यीय आयोगाची स्थापना देखील केली होती. आयोगाने नोव्हेंबरमध्ये अहवाल सादर करणे सर्वांना अपेक्षित आहे.

या भुदान चळवळी अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतमजुरांना देखिल जमिनी प्राप्त होणार आहेत , या चळवळीला काही दिवस स्थगिती देण्यात आली आहे . जमिनीची उपलब्धेनुसार भुमिहीन शेतमजुरांना जमिनी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत .

Leave a Comment