आवडेल तेथे कुठेही प्रवास : महाराष्ट्र एस.टी. बस प्रवास पास | MSRTC Transport Pass

या योजनेचे मुख्य नियम खालील प्रमाणेः-

  • १. या योजने अंतर्गत ७ व ४ दिवसाचे पास दिले जातील
  • २. साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी (साधी, जलद, रातराणी, शहरी, यशवंती (मिडी) आंतरराज्य मार्गासह ग्राह्य राहतील.
  • ३.निमआराम बससेवेसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले नाहीत शिवशाही बससेवेसाठी देण्यात येणारा पास शिवशाही बससेवेसह साधी,निमआराम,विनावातानुकुलीत शयन आसनी या सर्व सेवांसाठीआंतरराज्य मार्गासह ग्राह्य राहील.
वाहतूक सेवेचा प्रकार ७ दिवसाच्या पासाचे मुल्य ४ दिवसाच्या पासाचे मुल्य
प्रौढ मुले प्रौढ मुले
साधी(साधी,जलद,रात्रसेवा,शहरी,व यशवंती(मिडी) आंतरराज्यसह २०४० १०२५ ११७० ५८५
शिवशाही (आसनी) आंतरराज्यसह ३०३० १५२० १५२० ७६५

 

  • ४.या योजनेअंतर्गत देण्यात येणारे पास दहा दिवस अगोदरपर्यंत देता येईल.
  • ५.”आवडेल तेथे कोठेही प्रवास ” योजनेचे पास नियमीत बसेस सोबतच कोणत्याही जादा बसेसमध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या यात्रा बसमध्ये ग्राह्य राहील.

 

  • ६.सदर पासावर प्रवास करणाऱ्या पासधारकांसाठीते पासधारक आहेत म्हणून प्रवेश नाकारू नये.
  • ७.आवडेल तेथे प्रवास पासधारकांसाठी बसमधील आसनासाठी हमी देता येणार नाही,परंतु या योजनेतील पास धारकाना सदर पासावर आरक्षण भरून आसन आरक्षित करता येईल.

MSRTC : अधिकृत वेबसाईट वर माहिती पहा 

  • ८.या योजनेअंतर्गत प्रौढ पासधारकास २०  किलो व १२ वर्षाखालील मुलास १०  किलो प्रवासी सामान विनाआकार नेता येईल.
  • ९.पासधारकास आंतरराज्य मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस जेथपर्यंत जाते तिथपर्यंत राज्य परिवहन बसने प्रवास करता येईल.
  • १०.पास हरविल्यास त्याचे ऐवजी दुसरा पास देण्यात येणार नाही.वा हरविलेल्या पासाचा कोणताही परतावा दिला जाणार नाही.
  • ११.सदरचा पास अहस्तांतरणीय राहील.पासाचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास पास जप्त करण्यात येईल.
  • १२.प्रवासात वैयक्तीक वस्तु गहाळ झाल्यास अथवा कोणतेही नुकसान झाल्यास महामंडळ त्याची जबाबदारी स्विकारणार नाही.
  • १३.आवडेल तेथे कोठेही प्रवास पास योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या पासाच्या दिवसाची गणना ००.०० ते २४.०० अशी करण्यात येईल.पासाचे मुदतीच्या शेवटच्या दिवशी प्रवासी सदर पासावर २४.०० वा.नंतर प्रवास करत असेल तर पुढील प्रवासासाठी तिकीट घेणे आवश्यक राहील.
  • १४.काही वेळा रा.प.बसेस उशिरा सुटल्यामुळे,मार्गस्थ बिघाड झाल्यामुळे अगर काही अपरिहार्य कारणामुळे जी बस नियोजित पोहचण्याची वेळ २४.०० पूवी होती ती २४.०० नंतर पोहचत असेल व पासधारकाचा प्रवास खंडित झाला नसल्यास पासधारकांकडून तिकीट आकार वसूल करू नये.

लक्षात असू द्या जर पास तुमच्याकडून हरवला तर डुप्लिकेट पास मिळत नाही. किंवा त्यासाठी भरलेले पैसेही मिळणार नाही. त्यामुळे पास काढल्यानंतर तो व्यवस्थित सांभाळण्याची जबाबदारी तुमचीच असणार आहे.

त्याचप्रमाणे पास काढला एकाने पण त्यावर प्रवास दुसराच कोणी करत असेल तर असा  पास जप्त होऊ शकतो. कारण पास नॉन ट्रान्स्फरेबल म्हणजे अहस्तांतरणीय आहे. 

प्रवासात वैयक्तिक वस्तू गहाळ झाल्यास अथवा कोणतेही नुकसान झाल्यास महामंडळाची जबाबदारी घेत नाही. नातलगाचा मृत्यू, भूकंप आग लागणे, अतिवृष्टी, महापूर, नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे पास रद्द करायचा असेल तर प्रवासाच्या तारखेपूर्वी याची कल्पना देऊन तुम्हाला पाससाठी भरलेले पैसे परत मिळवता येतात. 

परंतु अशावेळी काढलेल्या प्रत्येक पासमागे ₹20 सेवाशुल्क कापून घेतले जाते.